Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादमध्ये 'संविधान वाचवा, देश वाचवाचा' गजर

Webdunia
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (08:51 IST)
देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
 
राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे 'संविधान वाचवा, देश वाचवा' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. संविधानिक तत्त्वांची मशाल घेऊन आज औरंगाबादमध्ये देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ, आदी उपस्थित होते.
 
संविधान वाचवा, देश वाचवा ही मोहीम आजच्या दिवसाला काळाची गरज होऊन बसली आहे. संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी बोलताना आ. अजित पवार यांनी दिला. तसेच सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत पवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाहीत हा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत? असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना आदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले ही मात्र आताचे सरकार तसं करताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments