Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे पुण्याची ओळख पुणे तिथे 'पाणी' उणे अशी झाली आहे!

Webdunia
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (09:12 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेला पश्चिम महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील #वडगाव_बुद्रुक येथे झालेल्या परिवर्तन सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. 
 
पुण्याची आतापर्यंत एक वेगळी ओळख होती. आधी म्हटलं जायचं पुणे तिथे काय उणे पण आज या भाजप सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की आज म्हटलं जातंय पुणे तिथे 'पाणी' उणे असे मत राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी वडगाव बुद्रुक येथील परिवर्तन सभेत व्यक्त केले. आज पुण्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम्ही सत्तेत असताना पुण्यात कधी पाण्याची कमतरता जाणवू दिली नाही पण आज भाजपला आठ आठ आमदार दिले, पण तरी देखील भाजपाने शहराला पाणी दिले नाही. निवडणूक आली म्हणून विविध कार्यक्रम राबविले जात आहे. सीएम चषक आयोजित करत आहे लोका़चे मन वळवण्याचा नवा फंडा या सरकारने आणला आहे. सरकार नियोजन करत नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त नागपूरबाबत; जास्त प्रेम आहे. असा टोला देखील आ. अजितदादांनी मारला. 
 
संपूर्ण पुणे खोदुन ठेवले आहे. शहरात वाहतूक कोंडी आहे. मनपाचे काम होत नाही, पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पुण्यात बलात्कारासारख्या घटना रोज घडत आहेत. पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. गुंडांना तडीपार केले जात नाही, पोलिसांचा वचक राहिला नाही. पण सरकार लक्ष घालत नाही. पालकमंत्री गिरीष बापटसुद्धा लक्ष घालत नाही, अशी टीकादेखील आ. अजितदादा पवार यांनी केली. 
 
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर कठोर टीका केली.
 
खडकवासल्यात कचऱ्याचे नियोजन नीट होत नाही, या सरकारला सोशल मीडियाची फार हौस आहे त्यामुळे सर्व सोशल मीडियावर मी सरकारला धारेवर धरते. इथला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक नगरसेवक कार्यक्षम आहे. जर कार्यक्षम नगरसेवकाचा पराभव होत असेल तर मला वाटतं की खरच ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

पुढील लेख
Show comments