Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

Webdunia
गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (15:23 IST)
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळ पाणी आजरांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. परंतू एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आले आहे ज्यात रुग्णांना नारळ पाण्यात दारू मिसळून पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले आहेत. 
 
हा धक्कादायक प्रकार मेडिकलमध्ये समोर आला आहे. रुग्णांच्या मागणीवर त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून नारळाच्या पाण्यात दारु टाकून दिलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेडिकलच्या वॉर्डसमध्ये नारळावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीच वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
 
मेडिकलमधील काही रुग्णांच्या आग्रहावरून त्यांचे नातेवाईक लपून-छपून त्यांना दारू पोहचवत असतात. वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असले तरी नारळ पाणी असल्याचे सांगून पुरवठा केला जातो. काही दिवसांआधी येथील डॉक्टरांना काही रुग्ण मद्य प्राशन करून असल्याचे आढळले. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सूक्ष्म निरीक्षण केले असता रुग्णाचे नातेवाईकच नारळ पाण्यात मिळवून दारू येथे आणत असल्याचे आढळले. 
 
दारू भरलेले नारळ पाणी पिऊन झाल्यावर रिकामे नारळ थेट वरच्या वार्डातून खाली फेकले जाते. त्यामुळे येथील मल वाहिनी अवरुद्ध होण्याची भीती आहे तसेच खाली उभे असणार्‍यांच्या डोक्यावर पडून ते जखमी होण्याची भीती देखील आहे. ही बाब लक्षात घेऊन रुग्णाला नारळ पाणी द्यायचे असेल तर ते ग्लासमध्ये देण्याची मागणी  वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments