Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अलिबाग : निवडणूक बिनविरोध होण्यात अडसर; थेट सरपंचपद ठरतोय कळीचा मुद्दा

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (08:40 IST)
अलिबाग । रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वहात आहेत. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यात अडसर निर्माण झाला आहे. सरपंच निवडीच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणच्या चर्चा फिसकटल्या आहेत. सरपंचपदावर ही चर्चा अडली आहे. आघाडीच्या चर्चेत देखील सरपंचपद हा कळीचा मुद्दा ठरतो आहे.
 
रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याखेरीज रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या 10 जागा तसेच 69 ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या 99 जागांसाठी देखील मतदान घेतले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
 
जिल्हयात शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप हे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. राज्यातील सत्तेत झालेल्या बदला मुळे यावेळी निवडणूकीची समीकरणे बदलणार आहेत. मात्र अस्थिर राजकीय परीस्थिती आणि पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे गावपताळीवरील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोणत्या पक्षाच्या किंवा गटाच्या बाजूने उभे रहायचे या मुद्यावर कार्यकर्ते बुचकळयात पडले आहेत.
 
सध्याची जिल्हयातील राजकीय स्थिती पाहिली तर कोणत्याही एका पक्षाला ग्रामपंचायतीपासून लोकसभेची निवडणूक एकटयाच्या जीवावर लढवून जिंकणे सोपे राहिले नाही. त्यामुळे युती आघाडया करण्याकडे सर्वच पक्षांचा कल दिसतो आहे. असे असले तरी जागावाटपासंदर्भात एकमत होताना दिसत नाही. ही सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरते आहे.
 
जिल्हयात विशेषतः दक्षिण भागात निवडणूका बिनविरोध करण्याचा ट्रेन्ड पूर्वीपासून होता आजही तो कायम आहे. राजकीय वादांमुळे बिघडणारे गावातील वातावरण आणि निवडणूकीसाठी खर्च होणारा पैसा हे यामागचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे निवडणूका बिनविरोध करण्याकडे ग्रामस्थांचा कल असतो. गावपातळीवर या निवडणूका बिनविरोध केल्या जातात. मात्र राजकीय पक्षांच्या घुसखोरी आणि चढाओढीमुळे यात अडथळे निर्माण होत आहेत.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments