Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील 9 वी, 11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करणार

महाराष्ट्रातील 9 वी, 11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करणार
, बुधवार, 7 एप्रिल 2021 (16:53 IST)
शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता शिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. 
 
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकमुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला गेला. आता स्थिती बघता नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीही नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात स्थिती गंभीर, PMC ने लष्कराकडे मागितली मदत