Festival Posters

ऑल द बेस्ट, राज्यात १२ वीच्या परीक्षांना सुरुवात

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:17 IST)
राज्यात  १२ वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. त्याआधी पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाकडून महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षे संदर्भात काही होणार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
 
विज्ञान शाखा : ७,६०,०४६
कला शाखा : ३,८१,९८२
वाणिज्य : ३,२९,९०५
वोकेशनल : ३७,२२६
आय टी आय : ४७५०
 
परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलीये.
 
ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरला  परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केलेय.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

इस्रायली हल्ल्यात वरिष्ठ कमांडर रईद सईद ठार

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी मेस्सीची भेट घेतली आणि 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे तिकीट दिले

मनू भाकर आणि सिमरनप्रीत यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली

मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान कोसळले, सात जणांचा मृत्यू

दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, अनेक बस जळून खाक, चार जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments