Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भ्रष्टाचार पचवता यावा म्हणून युती : नारायण राणे

Webdunia
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (17:34 IST)
शिवसेना नितिमत्‍ता नसलेला पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेला एकही शब्‍द खरा करुन दाखविला नाही. शिवसेना बोलेल तसा वागेल असा पक्ष नाही. मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्‍त भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार पचवता यावा, यासाठीच शिवसेनेने भाजपसोबत युती केल्‍याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.  आता नारायण राणे यांनीही पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. 
 
‘‘युती सडली होती तर मग पुन्हा एकत्र का आला?’’ असा प्रश्न उपस्‍थित करत स्‍वबळावर लढण्यास तयार झालेल्‍या इच्छुक नेत्‍यांनी आता काय करायचे? असा प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्‍थित केला. राणे म्‍हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी आधी स्‍वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. त्‍यासाठी त्‍यांनी कार्यकर्त्यांना कामालाही लागण्याचे आवाहन केले होते. त्‍यांच्या आवाहनानुसार स्‍वबळावर लढण्यास तयार झालेल्‍या उमेदवांनी आता ऐनवेळी काय करायचे? तसेच स्‍वबळाची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांनी स्‍वत:ची फजिती करुन घेतली आहे, अशी टीका राणे यांनी केली. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments