Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला घरात घुसून बेदम मारहाण

Webdunia
गुरूवार, 24 जून 2021 (17:12 IST)
अहमदनगर  :- विजेचे कनेक्शन कट करण्याच्या कारणावरुन पाच जणांनी वीज कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला घरात घुसून काठी तसेच लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.ही घटना कारेगाव येथे घडली. याबाबत लखीचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रताप कांतीलाल कातोरे (वय ३८), हर्षद शामराव धुमाळ (वय २०), शामराव सखाराम धुमाळ (वय ४८ ), अमोल कांतीलाल कातोरे (वय ३४) चौघे (रा.कारेगाव) ओमकार सुरेश नळकांडे , (रा.खंडाळे) या एकूण पाच जणावर गुन्हा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक केली असून दोन जण पसार आहेत.
 
या बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले कि, महावितरणचे तंत्रज्ञ लखीचंद राठोड हे वीज बिल थकबाकीची यादी घेऊन कारेगाव येथील हर्षद धुमाळ यांच्याकडे गेले असता, धुमाळ यास तुमचे वीज बिल भरा नाहीतर
कनेक्शन कट करण्यात येईल, असे सांगितले.
 
त्यानंतर दि.२२ रोजी लखीचंद्र राठोडच्या फोनवर प्रताप कातोरे यांनी फोन करुन राठोड यास, आमच्या पाहुण्याचे वीजबिल थकले आहे म्हणून तू वीज कनेक्शन कट करणार आहे का?
असे विचारले. यावर राठोड याने बिलाबाबत तुम्ही वायरमन लांडे यांच्यासोबत बोला असे कातोरे यांना सांगितले. त्यावेळेस कातोरे यांनी धमकी दिली.
 
त्यानंतर प्रताप साकोरे, हर्षद धुमाळ, शामराव धुमाळ, अमोल कातोरे आणि ओंकार नळकांडे हे पाच जण राठोड यांच्या घरी येवून त्यांना मारहाण केली. त्यावेळी तेथे वायरमन संतोष लांडे हे आले. त्यांनी या सवार्ना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
 
परंतु त्यांनी वायरमन लांडे यांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात, नऊ भारतीयांचा मृत्यू

वरुण चक्रवर्तीने 5 विकेट घेऊन इतिहास रचला

अमेरिका: भारतातून येणाऱ्या धाग्याच्या खेपात 70,000 झोपेच्या गोळ्या सापडल्या

ऑलिंपिकचे आयोजन केल्याने भारतात खेळांना नवीन उंची मिळेल: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रंगारंग समारंभात 38 व्या राष्ट्रीय खेळांना सुरुवात

पुढील लेख
Show comments