Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरण लातूर मध्ये आंदोलन

Webdunia
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (17:06 IST)
लातूर येथील परीक्षांच्या उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात राज्यपाल यांच्या आदेशाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीचा अहवाल सादर होऊनही कारवाई करण्यास स्वारातिम विद्यापीठ विलंब करत आहे त्या निषेधार्थ युवासेनेने लातुरच्या विद्यापीठ केंद्रासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. लातूर येथील एमएस बिडवे अभियांत्रिकी कॉलेज येथे स्वारातीम विद्यापीठ नांदेड यांचे अधिकृत पेपर तपासणी केंद्र असताना या केंद्रावर उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावून मार्कांत छेडछाड आणि पुनर्मुल्यांकनामध्ये ठराविक विद्यार्थ्यांचे मार्क वाढविण्यात आल्याची तक्रार युवासेना सहसचिव तथा सिनेट सदस्य प्रा. सूरज दामरे यांनी राज्यपाल आणि कुलगुरू यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने आपला अहवाल सादर करून महिना उलटून गेला तरी दोषींवर कारवाई केली जात नाही यावरून कुलगुरू आरोपींना पाठीशी घालत आहेत आणि अशा गैरप्रकारांना जणू त्यांची समंतीच आहे हे दाखवून देत आहेत. दोषींवर कारवाई होत नाही त्यामुळे युवासेनेच्या वतीने स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्रासमोर युवासेनेने बोंबाबोंब आंदोलन केले. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र होईल. होणाऱ्या गैरसोयीस पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असे प्रा. सूरज दामरे यांनी यावेळी बजावले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

वाल्मिक कराड बीडच्या न्यायालयात हजर झाले, समर्थकांचे त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने

LIVE: सरपंचाच्या हत्येशी संबंधित आरोपी वाल्मिक कराड बीड न्यायालयात हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले

राहुल गांधी आरएसएस प्रमुखांवर टीकास्त्र सोडत म्हणाले मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केला

पतंगाच्या मांजाने गळा चिरला गेल्याने चार जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एका 4 वर्षाच्या मुलाचाही समावेश

पुढील लेख
Show comments