rashifal-2026

दोन वर्षांपासून बंद अंगणवाड्याही उघडणार

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (16:40 IST)
कोरोना संसर्ग व प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाड्या बंद होत्या. आता मात्र शासन स्तरावरून अंगणवाड्या सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहे. बालकांना गरम ताजा आहार पुन्हा मिळणार आहे, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज विधान परिषदेत दिली आहे.
 
विधान परिषदेत आमदार रणजित पाटील यांनी अंगणवाडीतील बालकांना गरम ताजा आहार केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला असताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की कोविड काळात अंगणवाड्या सुरू ठेवणे आणि बालकांना आहार देणे शक्य नव्हते, त्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला होता. गरम ताज्या आहाराच्या ऐवजी बालकांना त्यांच्या घरापर्यंत पोषण आहार मिळेल याची तजवीज केली. यासाठी सरकारने टेक होम रेशन ही योजना सुरू केली होती आणि या योजनेद्वारे गेली दोन वर्षे नियमितपणे राज्यातील लाखो अंगणवाडी बालकांना पोषण आहार पोचवण्यात आला.
 
त्यांनी म्हटले की आता कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आली असून अंगणवाड्या येत्या दोन दिवसात सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत. अंगणवाड्या सुरू झाल्यानंतर बालकांना पुन्हा गरम ताजा आहार दिला जाईल. यासाठी 45 निविदा काढण्यात आल्या आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून बालकांना पुन्हा एकदा सकस गरम ताजा आहार अंगणवाड्यांच्या माध्यमातून दिला जाईल, अशी ग्वाही ठाकूर यांनी सभागृहात दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

बीडमध्ये अपघातात शिवसेना नेत्याचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्लाला भूकंपाचा धक्का

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून भाजप नेत्याची ४६ लाख रुपयांची फसवणूक

आदित्य ठाकरे यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला, सर्वाधिक कर भरणारे राज्य सर्वात दुर्लक्षित असल्याचे म्हटले

पुढील लेख