Dharma Sangrah

‘त्या’ व्हिडीओप्रकरणी संजय राऊतांकडून अनिल परब यांची पाठराखण; म्हणाले…

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (21:30 IST)
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मंगळवारी अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा जामिनावर मुक्तता करण्यात आली. यादरम्यान वाहतूक मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना धमकीचं एक निनावी पत्र आलं होतं. त्या पत्राच्या आधारे काही लोकांना अटक झाली होती. त्यांच्याविषयी काय पुरावे हे आहेत याचे संभ्रम आहेत. योगी आदित्यनाय यांच्याविषयी सोशल मीडियावर उपशब्द वापरले गेले. देशद्रोहाच्या आरोपाखाली पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते त्यांना अटक करुन तुरुंगात डांबलेलं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना जाहीरपणे कोणी मारण्याच्या धमक्या देत असेल आणि ती व्यक्ती कितीही मोठी असेल आणि त्याच्यावर कारवाई झाली असेल तर त्याच्यावर एवढा गोंधळ करण्याचं कारण नाही आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
“राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत आहे का असा प्रश्न विचारला असता, ही सुडबुद्धीची व्याख्या एकदा समजून घेतली पाहिजे. सुडाने कारवाई करायला आमच्या हातामध्ये सीबीआय किंवा ईडी नाही. या देशात सुडाने काय आणि कुठे कारवाया होत आहेत यासंदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्यावर ज्या कारवाई सुरु आहेत त्याला सुडाच्या कारवाया म्हटल्या जातात. महाराष्ट्रात धमकीच्या गुन्ह्यात कारवाई झाली ती सुडाची कारवाई होते?,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनिल परब यांच्या व्हिडिओ क्लिपसंदर्भात प्रश्न विचारला असता, “सरकारला पोलिसांना आदेश देण्याचा अधिकार नाही का? ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी क्लिप पाहिलेली नाही. पण मंत्रीमंडळातील मंत्री हा सरकारचा एक भाग असतो. तुम्ही त्यांचे नाव ऐकले का याला अटक करा किंवा त्याला अटक करा? भास्कर जाधव मंत्रीमंडळात नाहीत. तुम्हाला काहीही दिसेल. जे पाहायचे आहे ते न्यायालय पाहिल,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मलकापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडाराच्या देवरी उड्डाणपुलावरील खड्ड्यांने घेतला आणखी एका तरुणाचा जीव

जशपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रेलरशी धडक, पाच जणांचा मृत्यू

स्फोट झाला तेव्हा डान्स फ्लोअरवर 100लोक नाचत होते; गोवा नाईटक्लबचा व्हिडिओ समोर आला

दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी

पुढील लेख
Show comments