Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर

Webdunia
शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (23:09 IST)
अहमदनगरमध्ये कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले.
 
तर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिसाचे पत्रक चिकटविण्यात आले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या सुचनेनूसार नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन इंपिरीयल चौकातील पुणे बस स्थानक व शहरातील प्रमुख चौकात करण्यात आले.
 
ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या संकटकाळात प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात योग्य नियोजन करीत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर येत आहे.
 
पालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना जिल्ह्यात येण्यास तयार नाही. ते कधीतरी येऊन अधिकार्‍यांची बैठक घेतात, नियोजन न करता निघून जातात. उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तर दररोज नगरमध्ये चाळीस ते पन्नास नागरिक कोरोनाने मृत्यूमुखी पडत असताना, मुंबई व कोल्हापूरला जाणार्‍या नागरिकांनी पालकमंत्री दिसल्यास त्यांना नगरमध्ये घेऊन येण्याचे आवाहन केले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments