Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसला पुन्हा एक धक्का; "या" माजी मंत्र्यांनी दिला राजीनामा

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:38 IST)
महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण काही कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.यामध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. त्यांची राज्यसभेची खासदारकी जवळपास निश्चित आहे.
 
तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा धक्का पक्ष पचवत नाही तोच आणखी एक धक्का काँग्रेसला पडला. काँग्रेसमधील आणखी एक दिग्गज नेता पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते.
 
काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बसवराज पाटील हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. पण त्यांनी आता कार्यध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
ते उद्या सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. बसवराज पाटील यांचं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर या भागात प्राबल्य आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

IND vs SA Final :भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

मोदीजींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचार केला तर आम्ही जिंकू...' शरद पवारांचा पंतप्रधानांवर टोला

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 4 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांन कडून भरपाई जाहीर

सर्व पहा

नवीन

NEET पेपर लीक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, गुजरातमध्ये सात ठिकाणी छापे

नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी रतन टाटांचे उदाहरण दिले

टी-20 वर्ल्डकप : वर्ल्डकप फायनलमध्ये भारताची खराब सुरुवात, रोहित, ऋषभ तंबूत परतले

अरविंद केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, आतापर्यंत काय घडलं?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत दुसरा टी-20 वर्ल्डकप जिंकेल का?

पुढील लेख
Show comments