Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाऊस माघारी फिरताच राज्यात ‘थंडी’ची चाहूल

Webdunia
गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (21:13 IST)
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने निरोप घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातामध्ये थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये थंडीमुळे हुडहुडी वाढली आहे.
सध्या उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली आहे.
राज्यामधील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 20 अंशांच्या खाली आले आहे. बऱ्याच ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशाच्या आसपास आहे. तर कमाल तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments