suvichar

थंड पाणी, सरबत पिऊ नका, एसी लावू नका

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (23:08 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा फेसबुक लाइव्ह या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला एकदा पुन्हा कोरोना संदर्भात सल्ले ‍दिले. या दरम्यान त्यांनी जनतेला एसीचा वापर न करण्याचा सल्ला दिला. कारण एसीमुळे करोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
 
तसेच त्यांनी थंड पाणी, सरबत पिऊ नका असाही सल्ला दिला आहे. उन्हाळा सुरु होत आहे आणि त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी साहजिक आहे मात्र शक्यतो ते टाळा. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नका. असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की हे करोनावर उपाय म्हणून नाही तर सर्दी खोकल्याचा धोका टाळण्यासाठी सांगत आहे. 
 
त्यांनी जनतेला अॅलर्जीपासून दर राहण्याचा सल्ला दिला आहे. थंड पेय पिल्याने सर्दी, खोकला होण्याचा धोका वाढतो आणि ते टाळण्यासाठी त्यांनी असा सल्ला दिला.
 
तसेच त्यांनी सर्दी खोकल्याची लक्षणं आढळली तर शासकीय रुग्णालयात जा असे आवाहन केले आहे. अशात नेहमीच्या डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात गेल्याने करोनाची लक्षणे वेळीच कळून येतील तसेच इतरांनाही त्याची लागण होणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments