Festival Posters

शिवसेना प्रमुखांची संपत्तीचा वाद मिटला, हे ठाकरे झाले खरे वारस

Webdunia
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (16:53 IST)
राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा राजकारणी, लोकांचा नेता असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे त्यांचे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा संपूर्ण वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल काहीतरी गफलत असून त्यात संशय व्यक्त केला. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी मात्र अचानक दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली असून,  खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं जयदेव ठाकरे स्पष्ट करत, याचिका मागे घेतली आहे. 
 
बाळासाहेब ठाकरेंचे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. उद्धव यांनी उच्च न्यायालयात त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले असा दावा केला होता. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला मात्र अचानक मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे शिवसेना जसे उद्धव वारस होते तसे आता मातोश्रीचे सुद्धा उद्धव वारस असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments