Marathi Biodata Maker

शिवसेना प्रमुखांची संपत्तीचा वाद मिटला, हे ठाकरे झाले खरे वारस

Webdunia
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (16:53 IST)
राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा राजकारणी, लोकांचा नेता असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे त्यांचे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा संपूर्ण वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल काहीतरी गफलत असून त्यात संशय व्यक्त केला. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी मात्र अचानक दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली असून,  खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं जयदेव ठाकरे स्पष्ट करत, याचिका मागे घेतली आहे. 
 
बाळासाहेब ठाकरेंचे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. उद्धव यांनी उच्च न्यायालयात त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले असा दावा केला होता. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला मात्र अचानक मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे शिवसेना जसे उद्धव वारस होते तसे आता मातोश्रीचे सुद्धा उद्धव वारस असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'पवारांना त्यांचे शिष्य सल्ला देत आहे,' राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळांवर संजय राऊत यांचा कडक उपहास

NCP party merger 'शोकसभेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर बोलतील; आमदार रोहित यांचे विधान

९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार; अजित पवार यांच्या निधनामुळे कोणतेही उत्सव होणार नाही

LIVE: रोहित पवार यांनी १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे आवाहन केले

मेघालयातील "बेकायदेशीर" कोळसा खाणीत स्फोट, १६ कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments