Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप नेत्या चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2023 (20:52 IST)
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू असून चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला खडसावले आहे. चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला. त्या अभिनेत्री उर्फी जावेदवर प्रचंड संतापल्या असून, उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही, ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
 
त्या म्हणाल्या, “आम्ही काय काम करतो, हे ऊर्फी सारख्या बाईला मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अश्या शब्दांत तिला सुनावले आहे. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हा नंगानाच दिसत नाही का?” असा सवाल त्यानी यावेळी केला आहे.
 
मला तर ही उर्फट बाई कोण आहे, हे माहीतही नाही, एका बाईने मला हे व्हिडिओ पाठवले, तिने मला सांगितलं, मुंबईच्या रस्त्यावर काय चाललंय बघा. हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही पोलिसांत तक्रार केलीय. याला अंतिम स्वरूप दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
 
जे ट्रोलर्स आमच्यावर टीका करत आहे, त्यांना हे मान्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे. तुम्ही चॅनलवाले बातम्या करताना का ब्लर दाखवता?, कारण तुम्ही ते दाखवू शकत नाही. मग अशा या उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले आहे.
 
ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन, आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन असे चित्रा वाघ यांनी सांगितले, त्या प्रचंड संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या काय व्हायचं, ते होऊ द्या.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments