Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाचे नेते आजही विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याची भाषा करतात - जयंत पाटील

Webdunia
बुधवार, 29 मे 2019 (10:06 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि दुष्काळावर विस्तृत चर्चा झाली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. लोकसभेच्या सर्व गोष्टी मागे सारून आम्ही विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढू, असेही पाटील म्हणाले. ईव्हीएम बाबत चर्चा झाली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आज शंका बोलून दाखवली की अनेक मतदारसंघात आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. याबाबत पुढे आणखी सखोल माहिती घेऊ, असेही पाटील म्हणाले. भाजपाचे नेते आजही विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याची भाषा करत आहेत. भाजपाला स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर भरवसा राहिला नाही का? असा खोचक सवाल करत आमचे लोक प्रलोभनांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments