Marathi Biodata Maker

बोर्ड परीक्षा वर्षातून २ वेळा

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2023 (08:58 IST)
लातूर : राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून यात एका वर्षात २ वेळा बोर्डाच्या परीक्षा व बारावीच्या इयत्तेत सेमिस्टर प्रणाली लागू करण्यात येणार आहे शिवाय, इतरही बदल करण्यात आले असून या धोरणाचे मराठवाडा पालक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात बदल सुचवले आहेत. या मसुद्यात वर्गात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था, कपडे, भाषा व संस्कृतीशी संबंधित इतर विषयांवरही प्रस्ताव देण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांच्या विकासावर भर देण्यात आला असून संतुलित आहार, पारंपारिक खेळ, योगासने याद्वारे मुलांच्या नैतिक विकासावर भर देण्यात येणार आहे. शैक्षणिक संरचनेतही बदल करण्यात आले आहेत.
 
अकरावी आणि बारावीमध्ये वर्षअखेरीस एका परीक्षेऐवजी मॉड्युलर बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा व दोन्ही सेमिस्टरचे गुण एकत्र करून मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. या शैक्षणिक धोरणाचे स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी आभार मानले आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षण कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली

बीएमसीने मुंबईकरांसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत भरती-ओहोटीचा इशारा जारी केला

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकारचा कोणताही सहभाग नाही"

पुण्याच्या नवले पूल दुर्घटनेचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला, नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments