Dharma Sangrah

कौशल्य विकास योजनेचा कारभार बोगस :मनसे

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:21 IST)
मनसेने नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्र संदीप देशपांडे यांनी विभागाच्या आयुक्तांना दिले..तसेच नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. संदीप देशपांडे यांनी नवाब मलिकांवर खोचक टीका केलंय.
 
आम्ही कौशल्य विकास योजनेचा जो कारभार किती बोगस आहे हे पुराव्या सह त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांना आम्ही विनंती केली आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. पण कंपन्या रजिस्ट्रेशन झालं पाहिजेत. या विभागाचा शंभर कोटीच्यावर टर्न ओवर आहे आणि कंपन्या रजिस्ट्रेशन होत नाही. मनसे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणार ज्याकडे भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. राज साहेबांनी पत्राच्या माध्यमातून त्यांना भूमिपुत्रांनसाठी रोजगार निर्मिती करा, असं सांगितल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
 
आमचा नवाब मलिकांना विरोध नाही परंतु नवाब मलिक यांच्याकडे कौशल्य विकास व रोजगार विभाग येतात. ते जावून जेल मध्ये बसले आहेत. आम्ही जॉब कोणाला विचारयचा. आम्हाला काम करावे लागणार आहे कारण मंत्री जेल मध्ये आहे. राजीनामा द्यायचा की नाही त्यांचा पक्ष ठरवेल. आमचा प्रश्न आहे की उदया आम्हाला मंत्री भेटले नाही तर आम्ही आर्थर रोड जेलला भेटण्यासाठी जायचं का? अशी खोचक टीका नवाब मलिकांवर संदीप देशपांडे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसने गुरे धडकली, कोकण रेल्वे मार्गावर तीन तास विस्कळीत

अरुणाचल प्रदेशला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर तीव्रता जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा रस्ते अपघातात मृत्यू

महाराष्ट्र बारावी बोर्ड परीक्षा २०२६ सुरू; कॉपी रोखण्यासाठी ८५% परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले

LIVE: महाराष्ट्रातील बारावीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे

पुढील लेख
Show comments