Marathi Biodata Maker

'दोघांनी दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची'-अजित पवार

Webdunia
रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:25 IST)
सचिवांना अधिकार देऊन दोघे `टिकोजीराव` दिल्ली वाऱ्या करीत आहेत. हा कसला कारभार? या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
 
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने `निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा` मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
 
राज्यात गेल्या 35 दिवसांपासून दोघेच जण कारभार करत असल्याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी म्हटलं, की "मंत्रिमंडळ स्थापन करण्यात का विलंब होत आहे? तेच समजत नाही. फुटलेल्या आमदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसावी, अशी शंका मनात येते. दोघांनी पदे घ्यायची. दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची. हा कसला कारभार?"
 
अजित पवार यांनी म्हटलं, "सर्व विभागाच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या संबंधित सचिवांकडे सोपवल्याबाबतचा आदेश मुख्यमंत्र्यांनी चार ऑगस्टला काढला. त्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, हे काय चालले आहे? मंत्रालयाचे नाव सचिवालय करा."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात परतण्यावरून राजकीय गोंधळ! सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्याला ओबीसी समुदायाने तीव्र प्रत्युत्तर दिले

गाडी 50 फूट दरीत कोसळून 3 जणांचा मृत्यू

अखेर माणिकराव कोकाटेंनी सोपवला राजीनामा

वर्गमित्र गणवेशाची खिल्ली उडवायचे; चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments