Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मात्र ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही : संभाजी राजे

But no one talks about OBC reservation: Sambhaji Raje Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
Webdunia
बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (16:23 IST)
भाजप नेत्या आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जो तो उठतो मराठा आरक्षणावर बोलतो,मात्र ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही असे म्हटलं होते.प्रीतम मुंडे यांच्या वक्तव्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ओबीसी समाजासोबती आमचं काम सुरु आहे.ओबीसीचे नेते भेटले होते असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच १२७ व्या घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेत पारित करण्यात आले असून या विधेयकाचेही संभाजीराजे यांनी स्वागत केलं आहे.
 
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी संभाजीराजेंना प्रीतम मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.मराठा आरक्षणाबाबत प्रीतम मुंडे यांचं वक्तव्य विरोधात्मक आहे. त्यांचे वक्तव्य १२७ व्या घटनादुरुस्तीशी संबंधित नाही.ओबीसी, मराठा आणि इतर जाती एकाच छताखाली राहतात.केंद्र सरकारने जसं इडब्लूएस दिलं आहे तसेच तुम्हाला ही करता येईल.मात्र दंगल करणं हा काही मार्ग नाही असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
 
संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेतो ते काम माझं सुरु राहील. ओबीसी समाजासोबत आमचं काम सुरुच आहे. ओबीसी समाजाचे नेतेमंडळी भेटले असून ओबीसी आरक्षणावर कधी लक्ष देणार असेही त्यांनी म्हटलं आहे. परंतू आम्ही सर्व एकच आहोत अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments