Marathi Biodata Maker

सुतगिरण्यांबाबत राज्य सरकारकडे स्वतंत्र योजना नाही

Webdunia
विधिमंडळात बुधवारी प्रसिद्ध झालेल्या ‘कॅग’च्या अहवालात राज्यातील सुतगिरण्यांबाबत राज्य सरकारकडे कोणतीच स्वंतत्र योजना अस्तित्वात नाही; सरकारकडे कोणतेच धोरण नाही असे म्हणत ‘कॅग’ने राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
 
राज्य सरकारने भांडवल दिलेल्या १३० सूत गिरण्यांपैकी २९ गिरण्या चक्क दिवाळखोरीत निघाल्या असून सात गिरण्या बंदच पडलेल्या आहेत. तसेच २१ गिरण्यांचे अजून बांधकाम सुरू आहे, याचीही गंभीर नोंद ‘कॅग’ने घेतली आहे.
 
१९७८ पासून राज्य सरकारने सहकारी सुतगिरण्यांना बांधकाम आणि यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अशा २८० गिरण्यांची नोंद झाली असली, तरी त्यापैकी केवळ १३० गिरण्याच सुरू झाल्या होत्या. आता त्यापैकी अवघ्या ६६ सूतगिरण्या सुरू असल्याचे ‘कॅग’ने म्हटले आहे. ७० टक्के गिरण्या कापूस उत्पादक पट्ट्यात असाव्यात असे राज्य सरकारचे धोरण असले तरी ते धोरण पाळण्यात आलेले नाही.
 
राज्यात २०१४-१७ दरम्यान ८१ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन झाले. मात्र त्यापैकी फक्त ३० टक्के कापूस या गिरण्यांनी वापरला. त्यामुळे राज्यातील विणकाम क्षेत्राच्या मागणी इतके सूत त्यांना पुरवता आले नाही. राज्यात तयार होणारा सर्व कापूस या गिरण्यांनी वापरावा, असे कोणतेही धोरणच सरकारने आखलेले नाही, असेही ‘कॅग’ने या अहवालात म्हटले आहे.
 
राज्यातील एकूण कापूस उत्पादन? क्षेत्रापैकी ७७ टक्के उत्पादन क्षेत्र औरंगाबाद आणि नागपूर या विभागात आहे. असे असले तरीही या विभागांत सुतगिरण्यांची संख्या मात्र अवघी ५९ आहे. राज्यातील एकूण गिरण्यांपैकी हे प्रमाण ४५ टक्के आहे. गंमत म्हणजे अवघा एक टक्काही कापसाचे उत्पादन नसलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र तब्बल ५२ गिरण्या आहेत. बहुसंख्य विणकर हे बिगर कापूस पट्ट्यात असल्यामुळे त्या पट्ट्यात 1993 पूर्वी अनेक सूत गिरण्या मंजूर करण्यात आल्या असा खुलासा वस्त्रोद्योग विभागाने कॅग कडे केला, मात्र त्यामुळे आमचे समाधान झालेले नाही, असे अहवालात 'कॅग'ने म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments