rashifal-2026

देशातील शेतकरी आणि जवान दोघेही अडचणीत-छगन भुजबळ

Webdunia
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (09:26 IST)
स्व.लाल बहादूर शास्त्री यांनी देशात 'जय जवान'आणि 'जय किसान' असा नारा दिला होता. त्यानुसार देशाची ध्येय धोरणे आखली मात्र सद्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून देशात न किसान सुखी हैं न जवान सुखी हैं असे  छगन भुजबळ यांनी म्‍हटले आहे. आज झाडी,ता.मालेगांव येथे चणकापूर उजवा कालवा रामेश्वर मार्गे कुंभार्डे-झाडी कालव्याच्या ५.८३ कोटी किंमतीच्या विकासकामाचे भूमिपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, प्रसाद हिरे,साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, तालुकाध्यक्ष संदीप पवार, विक्रम मार्कंड,रघुनाथ परेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम देसाई, राजेंद्र देवरे, रतन हलवर, शिवाजी सुपनर, जळगावचे सरपंच रोडू आहिरे, झाडीचे सरपंच माणिक नेमणार, पुंडलिक होडे, बाळासाहेब दुकळे, दिपक आहिरे, युवक तालुकाध्यक्ष अरुण अहिरे,विनोद चव्हाण, माणिकराव पाटील आदी उपस्थित होते. 
 
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असे त्यांनी सांगितले मात्र देशात आजही सैनिकांवर हल्ले होत आहे. पुलवामा येथे हल्ल्यात देशातील 44 जवान शहीद झाले आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत असताना पंतप्रधान मात्र न बोलवता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमास हजेरी लावून केक भरवतात अशी टीका त्यांनी केली. देशात सैनिक शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यात अश्रू असतांना सरकार मात्र सभा घेण्यात धन्यता मानत आहे. मात्र अशा परिस्थितीत सरकारसोबत आहोत अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. दहशतवाद्यांनी अशी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या मध्ये फूट पडणार नाही आम्ही एकसंघ राहु असे ठणकावून सांगत ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून संबोधतात त्यांना राहुल गांधी यांच्याकडून शिकण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 15 व्यांदा तुरुंगातून सोडण्यात येणार, 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरलं

आमदार संजय मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मतदान केंद्रात अडथळा आणल्याचा खटला रद्द

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

पुढील लेख
Show comments