Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई - जयंत पाटील

फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई - जयंत पाटील
, रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:22 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नव्हे तर भाजप नेते चंद्रकांत पाटीलांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
चंद्रकांत पाटील यांना फडणवीस यांच्या जागी जाऊन बसायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. भाजपवर आणि पुण्यातील सभेत फडणवीसांना केलेल्या भाषणावरही जयंत पाटील यांनी टीका केली.
पुण्याचं पाणी कमी केलं तर पुणेकर पाणी पाजतील असं म्हणणाऱ्या फडणवीस यांना पुणेकरच उत्तर देतील. फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी पुणेकरांमधे भीती पसरवण्याचं काम केले आहे, असंही पाटील म्हणाले.
नाशिक कुसुमाग्रजांची नगरी आहे. कुसुमाग्रज मराठीतील सर्वांत मोठे साहित्यिक आहेत. कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध करणं म्हणजे मराठी भाषेचा अपमान करण्यासारखं आहे. शिवसेना दूर गेली म्हणून सावरकारांचा मुद्दा साहित्य संमेलनात काढू नये, अशी सूचनाही त्यांनी फडणवीस यांना केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ममता बॅनर्जी कधीही मोदींबरोबर जातील, पृथ्वीराज चव्हाणांची टीका