Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात लॉक डाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (19:51 IST)
सध्या कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना (महाराष्ट्र कोरोनाव्हायरस) चे सर्वाधिक 47,827 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 202 लोक मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात नवीन संसर्गित रुग्णांचा आकडा 29,04,076 च्या वर गेला आहेत. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रकरणात विक्रमी वाढ झाल्याचे जाहीर केले. शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कोरोनातील परिस्थिती जर अशीच राहिली तर लॉकडाऊनची शक्यता नाकारता येणार नाही."आज संपूर्ण लॉकडाऊन चे संकेत देत आहे. लॉक डाऊन लावण्यात येत नाही. 2 दिवसातच मी चर्चा करून यावर निर्णय घेईन.  
शुक्रवारी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की ही मोठी कोंडी आहे. जर आपण लॉकडाउनची अंमलबजावणी केली तर आर्थिक चाक थांबेल. जर आर्थिक चाक कार्यरत असेल तर आपल्या सामोरं कठीण परिस्थिती दिसत आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान लघु व मध्यम उत्पन्न व्यवसायातील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आता पुष्कळ लोकांसाठी नवीन प्रमाणावर होईल. काही वेळा पूर्वी सिनेमा, रिटेल आणि शॉपिंग इंडस्ट्रीशी संबंधित संस्थांनी ठाकरे यांना महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करू नये अशी विनंती केली होती. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय), रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) आणि शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले होते की ते सरकारच्या सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरणं करीत आहेत, जर लॉकडाउन लागू केले तर व्यवसाय कमी होईल
उद्धव यांच्या मते लॉकडाउन टाळायचे असेल तर हे नियम पाळावे लागतील. लॉकडाऊन केल्यास विपक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचे म्हणत आहे . या वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की रस्त्यावर यायचे आहे तर नक्की या परंतु कोरोनाशी लढा देण्यासाठी या. आरोग्य कामगारांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा. 
ठाकरे म्हणाले की सध्या कोरोनाची ही लाट एका वादळं प्रमाणे आहे आणि लस म्हणजे छत्री प्रमाणे आहे. ही छत्री म्हणजे लस घेतल्यावर आपण सुरक्षित राहणार. परंतु सध्या आपण एका वादळाचा सामना करीत आहोत. या साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला प्रोटोकॉल चे पालन करावे लागणार. जसे की मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे.    

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments