Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संगमनेर तालुक्यात होणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे रोखला

Webdunia
सोमवार, 31 जानेवारी 2022 (20:56 IST)
बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे असतानाही जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी बालविवाह लावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांना रोखण्यात आले आहे.
असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह चाईल्ड लाईन आणि घारगाव पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर पठार भागातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह गावातील एका मुलासोबत होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर चाईल्ड लाईनने ही बाब घारगाव पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविली.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख आणि चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी बालविवाह होत असलेल्या गावात गेले.तेथे त्यांनी अल्पवयीन मुलीचे पालक आणि उपस्थित सर्वांना कायद्याची माहिती देत बालविवाह करणे हा अपराध असल्याचे सांगितले. त्यानंतर बालविवाह रोखला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments