Marathi Biodata Maker

लातूर येथे महा स्वच्छता अभियान

Webdunia
गुरूवार, 2 मार्च 2017 (14:45 IST)
अलिबागच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या साडेपाच हजार कार्यकर्त्यांनी लातुरात  शहर स्वच्छ करुन टाकलं आहे. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर ही मोहीम राबवली जात आहे. शासनाने त्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे. 
 
 जिल्हा परिषद, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, दयानंद गेट, शिवाजीनगर पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक कार्यालय, खोरी गल्ली, अंबाजोगाई मार्ग, मध्यवर्ती बस स्थानक, शासकीय रुग्णालय, मिनी मार्केट, गांधी चौक, हनुमान चौक, बाजार पेठ, गंजगोलाई, टाऊन हॉल मैदान यासह अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेसाठी साडेपाच हजार कार्यकर्त्यातून आठ पथके तयार करण्यात आली होती. जाईल त्या भागात शिस्तीत आणि शांततेत स्वच्छता करणारे कार्यकर्ते दिसत होते. हातमोजे, गमबूट, मास्क, झाडू आणि इतर साहित्य घेऊन हे कार्यकर्ते मनोभावे सेवा करीत होते. 
 
या कार्यकर्त्यांमध्ये मजूर, शेतकरी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, व्यापारी, सरकारी अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील १४८ शहरांमध्ये १४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके, २७२० कोलिमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अ‍ॅड. उमेश भोंजने यांनी दिली. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मे महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला

नवी मुंबई विमानतळाला 'दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली; "नाव देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही," असे कोर्टाने स्पष्ट केले

पेट्रोल वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला; मंत्री आता ऑनलाइन मंत्रिमंडळ बैठका घेणार

आई की वैरीण! आठ महिन्यांच्या चिमुकलीला पाजले ॲसिड, प्रकृती गंभीर

शेतकरी कर्जमाफी योजना आचारसंहितेमुळे रखडली, बळीराजा'मध्ये व्यापक असंतोष निर्माण

पुढील लेख
Show comments