Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जरांगेंच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशीच CM एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:23 IST)
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे उद्या 20 जानेवारी रोजी सकाळी जालन्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कुच करणार आहेत. मराठा बांधवांची सर्व तयारी देखील झाली आहे. त्यापूर्वीच मराठा आंदोलनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना एक मोठी अपडेट दिली आहे.
 
येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात शोधण्याचे काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग देखील नव्याने गठित केला आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
 
सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनबाबत विंडो देखील ओपन झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने अगोदरच सांगितले आहे की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान यावेळी मुंबईचा दिशेने येणारे आंदोलन देखील स्थगित करावे, अशी विनंती शंभूराज देसाई यांनी केली आहे. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनादरम्यान अनवधानाने काही माणसांमुळे परस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर ती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्याचे आंदोलन स्थगित करावे, असं देखील देसाई म्हणाले.
 
तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. सगेसोयरे बाबतीत जी व्याख्या केली आहे, त्याबाबत अध्यादेश काढावा लागला तरी सरकार तयार आहे. सरकार मराठा समाजाचा विरोधात नाही, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

कोण आहे 14 मंदिरातील साईंच्या मूर्ती हटवणारा अजय शर्मा ?

अजित पवार यांनी पंचशक्ती उपक्रमाची घोषणा केली, लोकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील

माजी उपमुख्यमंत्री सरकारी बंगला रिकामा करणार

कर्नाटकच्या मंत्र्यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

ठाण्यात क्रिप्टोकरन्सी स्कीममध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील 19 जणांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments