Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडी आली, आता दोन ते तीन दिवसांत गारवा वाढणार

Webdunia
राज्याच्या बहुतांश भागांत सध्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहे. मात्र, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने, त्याचप्रमाणे उत्तर भारतातून राज्याकडे थंड वारे वाहणार असल्याने दोन ते तीन दिवसांत गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील किमान तापमानात घट झाल्याने तेथे रात्री थंडी जाणवत आहे. मुंबईकरांना मात्र थंडीची प्रतीक्षा आहे.
 
दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा चटकाही बसू लागला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची स्थिती आहे. या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे. मात्र, ही स्थिती तीन ते चार दिवसांनी बदलणार आहे. राज्यात कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे गारवा वाढण्याचा अंदाज आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments