Festival Posters

कमी गुणांच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (10:36 IST)
कालच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या काळानंतर तब्बल दोन वर्षाने यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळतील या भीतीने सोलापूर टेम्भूर्णी च्या माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर निकालात तिला 81 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाल्याचं समजलं .अमृता दाजीराम लोंढे(17) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. अमृताने या वर्षी एप्रिल मध्ये दहावीची परीक्षा दिली असून परीक्षेत कमी गुण  मिळण्याची भीती तिला सतावत होती. त्यामुळे ती सतत तणावाखाली होती आणि कमी गुण  मिळण्याची भीती तिला सतावत होती. तिचा आईवडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर तिने असे टोकाचे पाऊल उचलले.ती  गुरुवारी मध्यरात्री घरातूनन सांगता ती निघाली आणि शेततळ्यांत तिने उडी घेतली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि शुक्रवारी तिचा मृतदेह घरापासून दूर शेतल्यात आढळून आला. पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात नोंद केली. काल निकाल जाहीर झाल्यावर तिला  दहावीच्या परीक्षेत 81  टक्के गुण  मिळाल्याचे समजले. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

पुढील लेख
Show comments