Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, असा अंदाज आहे :टोपे

Webdunia
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (17:20 IST)
राज्यात 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून राज्यात लसीकरण मोहिम आणखी वेगात वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणात महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला असून मिशन कवच कुंडल आणखी वेगाने राबवणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं
 
नगर नाशिकच्या सीमेवर कोरोनाची काही प्रकरणं वाढली आहेत, मात्र घाबरुन जाण्याची गरज नाही, प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करत आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, असा अंदाज आहे, असं असलं तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्या तरी शक्यता नाही, लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. पण दुसरी लाट शंभर टक्के संपली असं नाही फक्त फ्लॅट झालीये, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. 
 
यापुढे वैद्यकीय विभागात पदांना मुदतवाढ नाही, 60 वर्ष अंतिम अंतिम वय असेल असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. फटाकेबंदी योग्य आहे लोकांनी आवर घालावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.महाविद्यालये सुरू होणार असल्याने सर्व तरुण तरुणींचे अभिनंदन, त्यांनी लसीकरण कार्यक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.  

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments