rashifal-2026

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांनी शिक्षणासाठी तातडीने येथे अर्ज करावेत

Webdunia
बुधवार, 8 जून 2022 (07:53 IST)
कोविड-19 संसर्गामुळे एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांनी शैक्षणिक मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करावेत, असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधी अंतर्गत बालकांचे शालेय शुल्क, वसहतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या कारणांसाठी एकदाच मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी आपले तपशिलासह परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात नासर्डी पुलाजवळ, समाज कल्याण परिसर, नाशिक पुणे रोड, नाशिक क्लब समोर, नाशिक या ठिकाणी सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी केले आहे.
 
तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समन्वय समिती, लाभार्थी व पालकांना संपर्क करून या निधीबाबत कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत या कार्यालयात 522 अर्ज प्राप्त झाले असून त्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. फडोळ यांनी केले शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कामगार विभाग आघाडीवर

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

पुढील लेख
Show comments