Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुन्हे शाखेची कारवाई ; नाशिक, सोलापूर, संभाजीनगरनंतर आता 'या' जिल्ह्यातील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (20:18 IST)
पालघर :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोजच या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे.  अशातच  सोलापूर, नाशिक, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे  राज्यात होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  
 
यामुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्‍या टोळीचे कंबरडे मोडण्यात त्यांना यश आले आहे.  काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांनी ड्रग्स माफिया ललित पाटीलला  अटक केली आहे. त्यानंतर तपासाला वेग आला आहे.
 
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती.  त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेने ही गुप्त कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
 
या कारवाईबाबत   गोपनीयता बाळगण्यात आली आहे.  स्थानिक पोलिसांकडे माहिती नाही. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.   एका फार्म हाऊसवर  हा कारखाना चालू होता. या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

IND vs SA Final :भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

मोदीजींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचार केला तर आम्ही जिंकू...' शरद पवारांचा पंतप्रधानांवर टोला

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 4 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांन कडून भरपाई जाहीर

सर्व पहा

नवीन

NEET पेपर लीक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, गुजरातमध्ये सात ठिकाणी छापे

नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी रतन टाटांचे उदाहरण दिले

टी-20 वर्ल्डकप : वर्ल्डकप फायनलमध्ये भारताची खराब सुरुवात, रोहित, ऋषभ तंबूत परतले

अरविंद केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, आतापर्यंत काय घडलं?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत दुसरा टी-20 वर्ल्डकप जिंकेल का?

पुढील लेख
Show comments