Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवकाळी पावसामुळं पिकांना फटका, आर्थिक मदतीची मागणी

Crops hit due to untimely rains
Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (12:38 IST)
राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसाचा ग्रामीण महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. राज्यात मागील दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पावसाची शक्यता कायम आहे. याचा थेट परिणाम पिकांवर होताना दिसत आहे.
 
चाकण मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याला कुणीही खरेदी करीत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणी शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडले आहेत. पावासामुळे भात पाण्यात गेल्याने भाताला कोंब आले असून गवत कुजून गेलं आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे कारण भात वाया जात असून गवत कुजल्याने जनावरांचे हाल होणार आहेत.
 
हिंगोलीत ढगाळ वातावरणाचा गहू, हरभरा तूर, कापूस, ज्वारी या सारख्या पिकावर परिणाम होणार असून शेतकरी संकटात आढळला आहे. इकडे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे 75 ते 80 हजार एकरावरील घडकुजीने नुकसान झाल्याचे कळून येत आहे. सदर नुकसान सुमारे साडे तीन हजार कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना काही हातभार लावता येईल यासाठी विविध संघटनांकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

जागतिक वनीकरण दिन 21 मार्चला का साजरा केला जातो, इतिहास जाणून घ्या

UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा

गोहत्या केल्यास 'मकोका' लागू केला जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

नागपूर हिंसाचारात सायबर सेलने फेसबुकवर धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली

Israeli strikes on Gaza: इस्रायलकडून गाझामध्ये पुन्हा एकदा भयंकर हवाई हल्ले , अनेकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments