rashifal-2026

मंदिरांमध्ये मास्कशिवाय हजारो भाविकांची गर्दी

Webdunia
शनिवार, 1 जानेवारी 2022 (15:25 IST)
कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यभरात निर्बंध लादले गेले आहेत. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु धार्मिक स्थळांवर त्यांचा प्रभाव‍ दिसत नाहीये. मंदिरांसह बाजारपेठेतही मोठी गर्दी असते. चिंतेची बाब म्हणजे बहुतेक लोक संसर्ग रोखण्याकडे दुर्लक्ष करतात.
 
जागोजागी गर्दी टाळणं गरजेचं असल्यामुळे न्यू ईयर सेलिब्रेशनही फीकं पडलं परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. 
 
नवीन वर्षात भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली असताना काल रात्री 9 वाजता मंदिर बंद करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी 6 वाजेपासून साईदर्शन पुन्हा सुरु झाले असून कडाक्याच्या‌ थंडीतही भाविक साई दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे.
 
इकडे शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली आहे. तर कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली.
 
अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात मात्र सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रत्येक तासाला 1500 लोकांना सोडण्यात येणार आहे. या शिवाय श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर माहूरगड येथे भक्तांची गर्दी होता आहे. सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. अशात कोरोनाचे कितपत काटेकोर पालन होणार ही चितेंची बाब आहे कारण एवढ्या गर्दीत सामाजिक अंतर राखणे तसेच मास्क लावणे हे नियम पाळत असल्याची शक्यता फारच कमी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Best Hatchback Cars in India 2025: २०२५ मध्ये या परवडणाऱ्या कारने लोकप्रियता मिळवली, सामान्य माणूस आणि उच्चभ्रू दोघांमध्येही त्या लोकप्रिय झाल्या

टी-२० सामना रद्द झाल्यानंतर अखिलेश यादव यांच्या "चेहरा झाका" या वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले

केंद्र सरकारबद्दल संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, १९ डिसेंबर रोजी मोदी सरकार कोसळेल

प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट, जेवल्याशिवाय जाऊ नका असे आवाहन केले

वडिलांचा गळा दाबला, आईला करवतीने कापले... मुलाने हा रक्तरंजित खेळ का खेळला?

पुढील लेख