suvichar

यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:18 IST)
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ९२३ रुग्ण पॉझटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रात्री १० ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
शहर किंवा ग्रामीण भागात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास व जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. हॉटेल, चहा टपरी आदी सार्वजनिक ठिकाणी हँड सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतराचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंतच तर हॉटेल ९.३० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. याशिवाय ५ ते ९वीपर्यंत सुरू असलेल्या शिक्षण संस्था, शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहे. जिल्ह्यात यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद येथून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण येत आहे. या तालुक्यात कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

२९ मार्च रोजी नवी मुंबई विमानतळावरून सहा शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार

मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! नेपाळहून बिहारमार्गे कोट्यवधी रुपयांचे चरस वाहतूक केली जात होती, ४ जणांना अटक

LIVE: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग; १८ कामगारांचा मृत्यू

इराणने एकाच वेळी आठ देशांवर क्षेपणास्त्रे डागली, ट्रम्प यांची 'शासन बदलाची' घोषणा; इस्रायल-इराण हल्ल्याबद्दल १० महत्त्वाचे तथ्य

पुढील लेख
Show comments