Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चारधाम यात्रेवर निघालेल्या गाडीचा भीषण अपघात,दोघे जागीच ठार

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (13:40 IST)
गंगोत्रीच्या महामार्गावर कोपांगजवळ प्रवाशांनी भरलेल्या कारचा भीषण अपघात झाला  आहे. या कार मध्ये चालकासह एकूण 15 जण होते. त्यापैकी दोघे जागीच ठार झाले आहे. 
 
महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथून एका  टेम्पो ट्रॅव्हल ने 15 जण चारधाम यात्रेसाठी निघाले होते. रविवारी रात्री 12:30 च्या सुमारास गाडी गंगोत्री धाम मधून निघून हरसीलच्या दिशेने जात असता गंगोत्रीपासून 15 किमीच्या अंतरावर असलेल्या कोपांग आयटीबीपी कॅम्प जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन अनियंत्रित होऊन 100  मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात अलका बोटे आणि माधवन राहणार औरंगाबाद यांचा जागीच मृत्यू झाला तर उमा पाटील, अरनभ महर्षि, साक्षी सिंधे, अर्चना सिंधे, अनया महाजन, अनुप्रिया महर्षि, सई पवार, सुभाष सिंह राणा(रा. मानपूर), डॉ. वेंकेटेश, वर्षिता पाटील, आमरा एकबोटे, रजनीश सेठी व जितेंद्र सिंह(रा.देहरादून) जखमी झाले आहेत.
 
अपघाताची माहिती मिळतातच कोपांग मध्ये तैनात 35 व्या आयटीबीपीने तातडीने बचावकार्य सुरु केले. जखमींना हरसीलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments