Festival Posters

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2017 (10:19 IST)

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांची आर्थिक उलाढाल दहा लाखांच्या वर आहे किंवा जे शेतीशिवाय अन्य नोकरी-धंदा करतात, त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. तसेच शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये तब्बल चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग रविवारी प्रसारित करण्यात आला. या वेळी शेती आणि कर्जमाफीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी विस्ताराने उत्तरे देत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने योजना तयार करण्यात आली आहे. त्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

यमुना नदीवर पुढील महिन्यात क्रूझ सेवा सुरू होणार; मंत्री कपिल मिश्रा म्हणाले-मुंबईत बांधकाम सुरू

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

पाकिस्तानातील लग्न समारंभात शोककळा, गॅस सिलेंडर स्फोटात ८ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी; वधू-वरांचाही मृत्यू

थंडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात जीवाला मुकले; ट्रक केबिनमध्ये काका-पुतण्या मृतावस्थेत आढळले

'आमची मैत्रीपूर्ण लढत होती, पण अजित पवारांचा संयम ढळत आहे', मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले मोठे संकेत

पुढील लेख
Show comments