Dharma Sangrah

दिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा सत्ताधाऱ्यांना घेराव घालू - आ. ख्वाजा बेग

Webdunia
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:32 IST)
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने २९ ऑक्टोबर ते १ नोंहेबर २०१८ या कालावधीत पायी चालत ४५ किमी जवाब दो पदयात्रा काढून या बहिऱ्या सरकारला जाब विचारला. या दरम्यान सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करत मागण्या मान्य करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
 
पदयात्रेच्या माध्यमातून या बहिऱ्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. दिवाळीच्या आत जर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सत्ताधाऱ्यांना दिसतील तिथे घेराव घालू, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग  यांनी दिला. या निवेदनानुसार आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही, जीएसटी व नोटाबंदीमुळे उद्योग, व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. शासनाच्या रोज बदलत्या निर्णयांमुळे नोकरदार परेशान आहेत. याबाबत अनेक आंदोलने करूनही सरकारला जाग आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक आणि महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पदयात्रा काढली. यात विविध प्रश्नांचा भडिमार सरकारवर करत 'जवाब दो' पदयात्रा आंदोलनातून करण्यात आले.
 
यावेळी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, प्रदेश सरचिटणीस ययाती नाईक, माजी जि.प.उपाध्यक्ष वर्षा निकम, प्रदेश संघटन सचिव उत्तमराव शेळके,जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती पोटनिवडणुक: चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला इशारा, "उमेदवार उभा केला तर मोठा पराभव होईल"

जून ते जुलै या कालावधीत टीम इंडिया दहा टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

फसवणूक करणाऱ्या बाबा अशोक खरात यांच्या विरोधात ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांच्या विलीनीकरणावर शरद पवारांनी मौन सोडले; म्हणाले......

पश्चिम रेल्वेने विक्रम रचला, तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून ₹२०९.३० कोटी दंड वसूल केले

पुढील लेख
Show comments