Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज कनेक्शन तोडण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले हे आदेश

वीज कनेक्शन तोडण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले हे आदेश
Webdunia
सोमवार, 12 डिसेंबर 2022 (07:29 IST)
मुंबई – शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी केली.
 
विजय सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश मा. उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ज्या भागात हुक्का पार्लर आढळेल त्या परिसरातील पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा होणार...फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालकांचे मृतदेह आढळले

पतीला आत्महत्येची धमकी देणे ही क्रूरता मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

ठाण्यातील व्यावसायिकाची २२ लाख रुपयांची फसवणूक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झाले

पुढील लेख
Show comments