Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदे गटाकडे लक्ष

Webdunia
बुधवार, 29 जून 2022 (23:16 IST)
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.भाजप नेते देवेंद्र फडणवीस 1 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.मी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे, असे त्यांनी फेसबुक लाईव्हवर सांगितले. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी राजीनामा जाहीर केला आहे.खरं तर, गुरुवारी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.याबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला.यानंतर ठाकरे यांनी राजीनामा दिला.म्हणजेच आता बहुमत चाचणीला काही अर्थ नाही. 
 
'उद्धवजींचा राजीनामा आनंदाची गोष्ट नाही', शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
 
शिंदे गटाकडे सर्वांच्या नजरा
 
शिवसेना हा आपला पक्ष असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना म्हटले होते.ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.खरे तर एकनाथ शिंदे गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत आहे.मात्र, सरकार स्थापनेपूर्वी पाठिंबा देण्यासाठी शिंदे गटाला एकतर पक्ष म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल किंवा अन्य पक्षात सामील व्हावे लागेल.तसे, स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेणाऱ्या शिंदे गटाकडे ते सिद्ध करण्याइतपत संख्याबळ असल्याचे बोलले जात आहे. 
 
"फडणवीस परत येत आहेत" 
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनादेश देण्याचा आग्रह करताना फडणवीस यांनी ‘मी परत येईन’ असा नारा दिला होता.निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या विश्वासदर्शक ठरावात त्यांचा पराभव झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र पुरेशा आमदारांच्या पाठिंब्याअभावी सरकार स्थापन होऊ शकले नाही.
 
फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांमुळे भाजपला राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करता आला.288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत 106 आमदारांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे.शिवसेनेला 55, राष्ट्रवादीला 55 आणि काँग्रेसकडे 44 जागा आहेत.2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी संबंध तोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

दहावीच्या गरोदर विद्यार्थिनीची हत्या ! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

ऑफिसमध्ये सेक्स करा, आम्हाला लोकसंख्या वाढवायची आहे- पुतिन यांनी आपल्या देशवासीयांना सांगितले

पुण्यात भरधाव ऑटोरिक्षा चालवणाऱ्या विदेशी महिला पर्यटकाने बाईक स्वारांना उडवले ,एकाचा मृत्यू

Subhadra Yojana:काय आहे सुभद्रा योजना आणि महिलांना कसे मिळणार 50 हजार रुपये

कोण आहे आतिशी मार्लेना? आमदार ते मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments