Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लगाके लाईन मे देस, तुम चले गये परदेस – धनंजय मुंडे

Webdunia
बुधवार, 7 डिसेंबर 2016 (17:25 IST)
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य लोक, शेतकरी, मजूर यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ना चिठ्ठी, ना कोई संदेश, लगाके लाईन मे देस, तुम चले गये परदेस हे आता चालणार नाही असे म्हणत नोटबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी निघून गेल्याबाबत टिपण्णी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी तसेच गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी विधान परिषदेत सांगितले.
 
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, चांदया पासून बांद्यापर्यंतच्या माणसाला फटका बसला अशा या विषयावर चर्चा होत आहे. रांगेत काळे पैसेवाले कोणी नव्हते तर गरीब लोक रांगेत होती. देशातील १२५ कोटी लोक आज रांगेत आहेत. काळा पैसा आला की नाही ते माहीत नाही पण या रांगांमुळे ७० लोकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. राज्यातले १२ लोक बळी गेले त्यांना जबाबदार कोण आहे, असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. या मृत्यूला जबाबदार कोण ? ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
 
मुख्यमंत्री नोटबंदीला आर्थिक स्वातंत्र्य लढा म्हणत असतील, तर त्यामुळे जे बळी गेले ते शहीद नाहीत का, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments