Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे की “त्या’ शिवसेना नगरसेवकांना अटक करा

धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे की “त्या’ शिवसेना नगरसेवकांना अटक करा
नवी मुंबई , सोमवार, 4 मार्च 2019 (08:16 IST)
नवी मुंबईत उद्‌घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या वाद विकोपाला गेला आहे. या राड्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉड, कैचीने हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
 
पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली येत शहरातील वातावरण खराब करणाऱ्यांना पाठिंबा दिला असून पोलीस त्यांचे हुजरे झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हा हल्ला शिवसेना नगरसेवक करण मढवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी केला असल्याचा गंभीर आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. रबाले पोलीस ठाण्यात शनिवारी शिवसेना नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी, नगरसेविका विनया मढवी, इतर तीन जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र हे गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
 
आमदारांच्या गाडीवर हत्याराने हल्ला होवूनही जर पोलीस आयुक्त आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मसूद अजहरचा एयरस्ट्राइकमध्ये मृत्यू झाला की हे इम्रान खानचे नवीन षड्यंत्र आहे?