Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले - धनंजय मुंडे

Webdunia
सध्या देशभरातच कांद्याचे भाव पडले आहेत. राज्यातही कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. भाव पडल्याने शेतकरी संतप्त आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. मदतीच्या नावाखाली पुन्हा एकदा #कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना या सरकारने फसवलंय. सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलंय, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली आहे.
 
या सरकारने २०१६ मध्ये शेतकऱ्यांना १ रुपयाचं अनुदान दिले होते. ते अनुदानही अद्याप कुणाला मिळालेलं नाही. शेतकऱ्यांची मागणी ५०० रुपयांची असताना सरकार अनुदान देतंय अवघे २ रुपये... ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आम्ही हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर येत्या आठवड्यात शेतकऱ्यांसह आंदोलन करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. सरकारने देऊ केलेली मदत समाधानकारक नाही, होणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी, अशी मुंडे मागणी यांची भूमिका आहे.

संबंधित माहिती

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

पुढील लेख
Show comments