Festival Posters

सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले - धनंजय मुंडे

Webdunia
सध्या देशभरातच कांद्याचे भाव पडले आहेत. राज्यातही कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. भाव पडल्याने शेतकरी संतप्त आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. मदतीच्या नावाखाली पुन्हा एकदा #कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना या सरकारने फसवलंय. सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलंय, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली आहे.
 
या सरकारने २०१६ मध्ये शेतकऱ्यांना १ रुपयाचं अनुदान दिले होते. ते अनुदानही अद्याप कुणाला मिळालेलं नाही. शेतकऱ्यांची मागणी ५०० रुपयांची असताना सरकार अनुदान देतंय अवघे २ रुपये... ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आम्ही हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर येत्या आठवड्यात शेतकऱ्यांसह आंदोलन करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. सरकारने देऊ केलेली मदत समाधानकारक नाही, होणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी, अशी मुंडे मागणी यांची भूमिका आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

बडगाममध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या; मृतदेह घरापासून २०० मीटर अंतरावर आढळला

दुर्दैवी घटना: खेळता-खेळता बाथरूममध्ये गेली, बादलीत पडून १ वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

WHO चा गंभीर इशारा! इबोलाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

पुढील लेख
Show comments