Marathi Biodata Maker

नोटाबंदी विरोधात मतदानातून व्यक्त व्हा – धनंजय मुंडे

Webdunia
शनिवार, 10 डिसेंबर 2016 (17:00 IST)
काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन देत केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला पण त्याचा सर्वात जास्त त्रास सामान्य जनतेला झाला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात मतदानाच्या माध्यमातून व्यक्त व्हा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी मतदारांना केले. ते  उदगीर येथील सभेत बोलत होते. उदगीर नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर शेख आणि नगरसेवक पदाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली गेली होती. यावेळी मंचावर माजी मंत्री जयंत पाटील, निरीक्षक जीवनराव गोरे, प्रदेश सरचिटणीस बस्वाराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष बबन भोसले, निरीक्षक पप्पू कुलकर्णी, अध्यक्षपदाचे उमेदवार समीर शेख, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर सडकून टीका केली. ते म्हणाले की एक व्यक्ती देशातील १२५ कोटी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याचे खोटे स्वप्न जनतेला दाखवले. मोदी म्हणाले होते की नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आहे पण काळा पैसा असलेला एकही माणूस बँकांच्या रांगांमध्ये दिसला नाही. या निर्णयामुळे सामान्य माणुसच अडचणीत सापडला आहे. या त्रासाचा वचपा काढण्यासाठी नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळाली आहे, तेव्हा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करत, आपल्या असंतोषाला वाचा फोडा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले

पुढील लेख
Show comments