Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? पाटील यांचा फडणवीस यांना सवाल

Webdunia
मंगळवार, 7 जानेवारी 2020 (16:02 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एएनआयचा व्हिडीओ त्यांनी रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता. यावर मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना उत्तर देत काश्मीर मुक्त करा याचा अर्थ भेदभावापासून, नेटवर्कवरील आणि केंद्र सरकारच्या जाचातून मुक्त करा असा होतो. तुमच्यासारखे नेते शब्दांचे अनर्थ काढून तिरस्काराची भावना निर्माण करतात. तुमच्यासारखा जबाबदार नेते अशाप्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो यावर विश्वास बसत नाही असा चिमटा काढला.
 
कदाचित सत्ता गमावल्यानंतर असं होऊ शकतं नाहीतर तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? असा प्रश्न  पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटलांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, या फुटिरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. हे मतांचे राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर भेदभावापासून मुक्त आहे. तर पूर्वीपासूनच सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरात निर्बंध आहेत. आम्ही विरोधात असो वा सरकारमध्ये आमचं प्राधान्य सर्वात प्रथम राष्ट्राला राहिलं आहे असं फडणवीसांनी जयंत पाटलांना सांगितले. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments