Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे वाद

maharashtra news
Webdunia
सोमवार, 2 मार्च 2020 (16:52 IST)
देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे वाद सुरु झाला आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते.
 
कार्यक्रमात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं म्हटलं. “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे,” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.
 
पोंक्षे यांनी केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे… हा डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: पुण्यात सुप्रिया सुळे यांचे धरणे आंदोलन

टॅरिफ प्रकरणात मोदी मनमोहन सिंग बनले म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

श्रेयस अय्यरला काही सामने खेळूनही आयसीसी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून नामांकन मिळाले

डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सॅंटो डोमिंगोमध्ये नाईट क्लबचे छत कोसळले, 66जणांचा मृत्यू, 160 जण जखमी

पुढील लेख
Show comments