Marathi Biodata Maker

पंचनाम्याला विलंब करू नका, मोबाइलवरुन फोटो अपलोड करा

Webdunia
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (16:34 IST)
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सदरच्या पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 
 
आता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, काय अतिरिक्त मदत देता येईल त्यादृष्टीने निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचं हातातलं पीक वाया गेल्यामुळे दु:ख आहे. पालकमंत्री, आमदारांनी आपापल्या भागांना भेट द्यावी. सरकार हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळणार असल्याचे सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून ५३ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं आहे. कोकणात ४६, नाशिकमध्ये ५२ आणि नागपूरमध्ये ४८ तालुके बाधित झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

CBSE 12th Revaluation 2026: सीबीएसई बोर्डाने स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्याची तारीख वाढवली, आता २५ मे पर्यंत अर्ज करता येईल

४२ नवरदेव नटूनथटून आले, पण तिथे ना मंडप होता, ना नवरी; मध्य प्रदेशात लग्नाच्या नावाखाली विचित्र सामूहिक फसवणूक

धुळे येथे भीषण रस्ते अपघात, सहा जणांचा मृत्यू

बडगाममध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या; मृतदेह घरापासून २०० मीटर अंतरावर आढळला

दुर्दैवी घटना: खेळता-खेळता बाथरूममध्ये गेली, बादलीत पडून १ वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments