Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात भीषण पाणीटंचाई, केवळ 20.28 टक्के जलसाठा शिल्लक

Webdunia
गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:53 IST)
महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये केवळ 20.28 टक्के जलसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिह्यांमध्ये दर आठवडय़ाला दोनशे टँकरची मागणी वाढत आहे. मे महिन्यात पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. राज्यात मे 2016 सारखी भीषण पाणीटंचाई होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
 
मागील वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे राज्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर 5 हजार 500 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये विहिरी कोरडय़ा पडल्या असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे 4 हजार 594 टँकरनी वाडय़ावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सध्या अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खासकरून मराठवाडय़ाला मोठा फटका बसला आहे. मराठवाडय़ात सध्या 2 हजार 470 टँकरनी वाडय़ावस्त्यांची तहान भागवली जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments